आपल्या भागात आपल्या मदतीसाठी देवदुत बनुन शासनाचे प्रतीनीधी घरोघरी फिरत आहे. त्यांना मदत करणे, सहकार्य करणे हि आपली जबाबदारी आहे. शासनाने नागरिकांच्या सुरक्षेसाठी पुन्हा एकदा शहराचा सर्व्ह करण्याचा सूचना दिल्या आहेत. याची मदत कोरोना पासुन आपल्या गावापासून लांब ठेवण्यासाठी होणार आहे. आता ५० ते ६० घरासाठी एक प्रतीनीधी असे शिक्षक व नगरपरिषद प्रतीनीधी असे नियोजन केले आहे. आजपासून या सर्वे ला सुरवात झाली आहे. सर्व नागरिकांनी आपल्या भागातील प्रतीनीधींना सहकार्य करावे असे आवाहन नगराध्यक्षा साधनाताई भोसले, आरोग्य समिती सभापती विवेक परदेशी, मुख्यआधिकारी अनिकेत मनोरकर यांनी केली.
कोरोनाचे संकट लक्षात घेता सर्व नागरिकांसाठी पुढील काही दिवस महत्त्वाचे आहेत. आपल्या भागातील कोणीही नागरिक आजारी पडले, विषेषतः सर्दी , खोकला, अचानक तिव्र ताप येणे, दम लागणे, श्र्वास घेताना त्रास होणे अशा नागरिकांना वैद्यकीय मदत आवश्यक आहे. आशा नागरिकांना तपासणी साठी कॉटेज हॉस्पिटला नेणे आवश्यक आहे.नागरिकांनी त्वरित शासन प्रतीनीधी ला कळवले तर त्वरित तपासणी करता येईल.
जिवनाश्यक किराणा माल ,भाजी पाला ,औषधे आपणास मिळणार आहेत. जिवनाश्यक माल उपलब्ध होण्यासाठी शासन व्यापारींना, शेतकरींना मदत करत आहे. बरीच दुकानदार नागरिकांच्या हितासाठी घरपोच माल करत आहे. याचा लाभ घ्या घरीर रहा सुरक्षीत रहा.
परमेश्वर कृपेने घरी जे अन्न उपलब्ध असेल तेच अन्न सेवन करा. कित्येक लोकांना आपल्या गावी जायचे आहे , ते मधीच अडकले आहे. बरेच लोक असे आहेत त्यांना एक वेळचे जेवण मिळत नाही, कित्येक लोकांच्या घरी कामं केल्या शिवाय घरात चुल पेटत नाही. त्यांचे काय हाल होत असतील याचा विचार आपण केला का? असे गरजु लोक शोधुन त्यांना मदत करणे आपली जवाबदारी आहे. मि आपणास आवाहन करतो की गरजु लोक, ज्याचे हातावरचे पोट आहे, ज्याना खरोखर मदतीची आवश्यकता आहे अशा नागरिकांना मदत करा किंवा आमच्या प्रतीनीधींना निदर्शनास आणून द्या हि नम्र विनंती.

